तिवसा तालुका
| ?तिवसा महाराष्ट्र • भारत | |
| — तालुका — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जिल्हा | अमरावती |
| भाषा | मराठी |
| तहसील | तिवसा |
| पंचायत समिती | तिवसा |
| कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +त्रुटि: "+०७२२५" अयोग्य अंक आहे • MH27 |
तिवसा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी - गुरुकुंज आश्रम याच तालुक्यात आहे. तिवसा हे गाव अमरावती-नागपूर महामार्गावर अमरावती पासून ४५ कि.मी. अंतरावर आहे.
तिवसा येथून ३ कि.मी. अंतरावर शेंदूरजना बाजार हे गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे. हे गाव सूर्यगंगा नदीच्या तीरावर वसले असून तेथे श्री संत अच्युत महाराज यांचा आश्रम आहे.
प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने, हरण करताना, अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात. ते कौंडिण्यपूर हे गाव याच तालुक्यात आहे.
