सोनभद्र जिल्हा
| सोनभद्र जिल्हा | |
| उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा | |
| देश | |
| राज्य | उत्तर प्रदेश |
| क्षेत्रफळ | |
| - एकूण | ६,७८८ चौरस किमी (२,६२१ चौ. मैल) |
| लोकसंख्या | |
| -एकूण | १८,६२,५५९ |
| -लोकसंख्या घनता | २७० प्रति चौरस किमी (७०० /चौ. मैल) |
| संकेतस्थळ | |
सोनभद्र जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्वांचल भौगोलिक प्रदेशामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशाच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेला हा भारतामधील एकमेव जिल्हा आहे ज्याच्या सीमा चार राज्यांसोबत जोडल्या गेल्या आहेत. सोनभद्रच्या ईशान्येला बिहार, आग्नेयेला झारखंड, दक्षिणेला छत्तीसगढ तर पश्चिमेला मध्य प्रदेश ही राज्ये स्थित आहेत.
याचे प्रशासकीय केंद्र रॉबर्ट्सगंज येथे आहे.
