जिल्हा विभाजन
ब्रिटिशांच्या काळात दक्षिणी हिंदु्स्थानात एकूण ३० मराठीभाषिक जिल्हे होते. त्यांतले कारवार आणि बेळगाव हे सध्या कर्नाटकात आहेत. उरलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून आता बरेच नवे जिल्हे झाले आहेत.
- यापूर्वी झालेली जिल्हा विभाजने
रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा केला - १ मे १९८१ औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा केला – १ मे १९८१
उस्मानाबाद मधून लातूर वेगळा केला – १६ ऑगस्ट १९८२[१]
चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला – २६ ऑगस्ट १९८२
बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्हा वेगळा केला – ४ ऑक्टोंबर १९९०
अकोला जिल्ह्यातून वाशीम वेगळा केला – १ जुलै १९९८
धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा केला – १ जुलै १९९८
परभणी जिल्ह्यातून हिंगोलीची निर्मिती केली – १ मे १९९९
भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती केली – १ मे १९९९
ठाणे जिल्ह्यातून पालघरची निर्मिती झाली -१ ऑगस्ट २०१४
- नामबदल
काही जिल्ह्यांची नावे बदलली आहेत.
| जुने नाव | नवे नाव |
|---|---|
| कुलाबा | रायगड |
| उत्तर रत्नागिरी | रत्नागिरी |
| दक्षिण रत्नागिरी | सिंधुदुर्ग |
| पश्चिम खानदेश | धुळे |
| पूर्व खानदेश | जळगांव |
| उत्तर सातारा | सातारा |
| दक्षिण सातारा | सांगली |
संदर्भ
- ^ "जिल्हा प्रोफाईल". २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.